जिंदगी ना मिलेगी दोबारा…


जिंदगी ना मिलेगी दोबारा..


images%2B%25281%2529


*बिनधास्त जगा मित्रांनो*
                     
●एकदा का *चाळिशी* पार केली की “जास्त शिकलेला” आणि “कमी शिकलेला” दोघेही सारखेच …
(कमी शिकलेला कदाचित जास्त पैसे कमावत असेल)

● *पन्नाशी* नंतर तर “सुंदर” आणि “कुरूप” हा भेदभावच नष्ट होतो….दोन्ही सारखेच 
(कोण कितीका सुंदर असेना या वयात सुरकुत्या, डोळ्यांभोवतालची काळी वलये लपता लपत नाही )

● *साठी* नंतर तर “मोठी पोस्ट” आणि “लहान पोस्ट” असेही काही उरत नाही….दोन्ही सारखेच
(निवृत्तीनंतर तर ऑफीसातला प्यूनदेखील साहेबाला बघायचे टाळतोच.)

● *सत्तरी* पार केल्यानंतर “मोठे घर” आणि “लहान घर” असा विचार सुद्धा मनात येत नाही….दोन्ही सारखेच
(सांधेदु:खी बळावून हालचाल करणे मुश्किल झाले कि बसण्यापूर्ती जागा असली तरी पूरे.)

● *ऐंशी* नंतर गाठीशी “भरपूर पैसा” असला काय अन् नसला काय…. दोन्ही सारखेच
(जरी पैसा खर्च करावासा वाटला तरी स्वतःसाठी कुठे अन् कसा खर्च करावा हा मोठा प्रश्न ऊरतोच )

●नशीबाने *नव्वदी* पार केली (अभिनंदन) तर “झोपणे” आणि “उठणे” यांत सुद्धा फरक राहत नाही…दोन्ही सारखेच
(कारण उठून बसल्यावर आता करायचे काय हा गहन प्रश्न उरतोच)

अजुन *शंभरी* पार करायची ईच्छा आहे का ?

*जीवन साधे-सरळ-सोपे आहे.आनंदाने जगा…!*

उगाच नेहमी कुठले तरी गहन कोडे सोडवल्याचा आइन्स्टाइनचा आव आणि भाव आणू नका.

*एक लक्षात ठेवा…!*

*लांब पल्ल्याच्या शर्यतीत आपण सगळे समानच आहोत तेव्हा निर्भेळ आनंद लुटा, हसा.*

*स्वतःसाठी काही वेळ तरी जगायला शिका, कारण…… जिंदगी ना मिलेगी दोबारा.!*

Leave a comment