अरेच्चा… जगायचं राहूनच गेलं … ! (When to live your life?)

* आयुष्य जगायच कधी?

अरेच्चा   जगायचं राहूनच गेले … !



*वय 20* वर्षे – आता शिक्षण चालू आहे .
*25 वर्षे* — नोकरीच्या शोधात आहे.
*30 वर्षे* — लग्न करायचं आहे.
*35 वर्षे* — मुलं लहान आहेत
*40 वर्ष* — थोडं “सेटल” होऊ द्या.
*45 वर्षे* — वेळच मिळत नाही हो.
*50 वर्षे* — मुलगा / मुलगी दहावीला आहे.
*55 वर्ष*– प्रकृती बरी नसते. 
*60 वर्षे* — मुलामुलींचे लग्न करायची.
*65 वर्षे* — ईच्छा तर खूप आहे, पण गुडघ्याचा त्रास खूप वाढलाय.
*70 वर्ष*–  मेला.


17 दिवसाच्या आत सर्व प्राँपर्टीवरून तुमचे नाव कमी..


*अरेच्चा 
जगायचं राहूनच गेलं … ! 
  
 तेंव्हा आधी जगा ते पण माणुस होऊन आनंदाने …


आपल्या मालकीच अस कांहीच नाही या जगात…


बाकी सर्व इथेच राहणार आहे .

               
*झाडू जो पर्यंत एकत्र बांधलेला असतो तो पर्यंत तो ” कचरा ” साफ करतो पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो* *स्वतः”कचरा” होवून जातो.*
*त्यामुळे एकत्र रहा, एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांचा आदर करा, एकमेकांना मदत करा 
         
          ♥️जिंदगी ना मिलेगी दोबारा♥️


*आज मला एक नवीन शिकायला मिळाले.*
मी बाजारामध्ये द्राक्ष घेण्यासाठी गेलो .
मी विचारले *”काय भाव आहे ?*
त्यांनी सांगितले  : *”120 रूपये  किलो .”*
त्याच्या बाजुला काही द्राक्ष विखरुन पडली होती.  मी विचारले: *” याचा काय भाव आहे “*
तो बोलला  : *”50 रूपये किलो”*
मी विचारले  : ” इतका कमी भाव .? 
तो बोलला : “साहेब ही पण चांगली द्राक्ष आहेत..!! 
पण.. ती गुच्छातुन तुटून पडलेली आहेत, ती तुटून पडलेली द्राक्ष त्या गुच्छाला धरून नाही म्हणून किंमत कमी आहे 


तेव्हा मला कळाले…
जो व्यक्ती  *संगठन…समाज* आणि  *परिवार* याच्या पासुन अलग होतो त्याची किंमत …… अर्ध्याहून कमी होते…

अरेच्चा   जगायचं राहूनच गेले … !



कृपया आपले कितीही मतभेद झाले तरी आपण *परिवार, संघटन* आणि *मित्र* यांच्याशी सतत जोडून रहा… 

Leave a comment