🚩आषाढी वारी पालखी सोहळा…२०२२ 🚩गावांची अर्थपूर्ण नावे…🚩 Aashadhi ekadashi sohala – 2022.

 *पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत.*


🚩आषाढी वारी पालखी सोहळा... 🚩गावांची अर्थपूर्ण नावे...🚩
🚩आषाढी वारी पालखी सोहळा… 🚩गावांची अर्थपूर्ण नावे…🚩


*१) आळंदी -* पालखी आळंदीतून *(वद्य ।।९।।)* निघते. आळंदी म्हणजे *आत्मानंद.* पालखीचा प्रारंभ आत्मानंदातून होतो. 


*२) पुणे -* पालखी पुण्यात येते. पालखीबरोबर निघालो की जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होऊन *पुण्य* प्राप्त होते. *(भवानी पेठ, बुरडाच्या पुलाकडील पालखी विठोबा मंदिर, पुणे या ठिकाणी पालखीचा दोन दिवस मुक्काम असतो.)* 


🚩आषाढी वारी पालखी सोहळा... 🚩गावांची अर्थपूर्ण नावे...🚩



*३) दिवेघाट -* नंतर पालखी *संवत्सर ग्राम उर्फ सासवड* या क्षेत्राकडे निघते. सासवडला जाताना *दिवेघाटातून* म्हणजे *यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी* या अष्टांगयोगाच्या आचार *दिव्यातून* जावे लागते. 


*४) सासवड -* वड म्हणजे *सप्तचक्र. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा व शून्यचक्र* या सप्तचक्रांची जागृती ही जीवनाची गरज आहे व ती जागृती प्राणायामाने होते. प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण, श्वासावर ताबा म्हणजे *सासवडचा* मुक्काम व परमार्थाचा मार्ग सोपान होऊन *सोपानदेवांच्या* समाधीचे दर्शन घ्यावे.


*५) जेजुरी -* नंतर पालखी जेजुरीला येते. *ज = जितेंद्र ,*

*जोरी = जास्त त्रास न घेणे.*

म्हणजेच *जो जास्त त्रास न घेता इंद्रियांना जिंकतो तो आनंदी होतो.* 


🚩आषाढी वारी पालखी सोहळा... 🚩गावांची अर्थपूर्ण नावे...🚩



*६) वाल्ह्या -* भर दुपारी वाल्ह्यात येते. येथे दुपारचा मुक्काम असतो. भर तारुण्यात माणसाने *वाल्हे= कोमल, प्रेमळ, जिव्हाळासंपन्न* झाले पाहिजे. *(वाल्ह्यात वाल्मिकी ऋषींच्या समाधीचे दर्शन होते.)* 


*७) लोणंद -* त्यानंतर पालखी लोणंदला मुक्कामाला येते. *लो = देणे, आनंद = परमसुख.* श्रीविठ्ठल भक्तीसाठी घरदार सोडून आलेला वारकरी भक्तिरसाने परमानंदी होतो व तो आनंद इतरांना देतो. 


*८) तरडगाव – जर तू ब्रम्हानंदाचा आनंद घेतला नाहीस तर तुला जीवनात रडावे लागेल* या सिध्दांताचे चिंतन करण्यासाठी पालखी *तर + रड =तरडगावला* येते. 


*९) फलटण – ब्रम्हसत्यं जगन्मिथ्या।* म्हणजे ब्रम्ह हे पूर्ण सत्य आहे बाकी सारे जग फोलपटासारखे मिथ्या म्हणजे टाकाऊ आहे. हा अनुभव वारकऱ्यांना फलटणला आल्यावर येतो. हे जीवनाचे सत्य समजल्यावर


*१०) बरड -* संसारातील सुखदुःखादि द्वद्वापासून मुक्त होतो. त्याचे जीवनरुपी क्षेत्र वासनेचे तृणांकूर न फुटणारे *बरड* जमिनीसारखे होते. 


*११) नातेपुते -* नातेपुते या गावी इतर नात्याचा मोहातून मुक्त होऊन तो फक्त *श्रीविठ्ठलाचा* होतो.


🚩आषाढी वारी पालखी सोहळा... 🚩गावांची अर्थपूर्ण नावे...🚩



*१२) माळशिरस – माळ = साखळी + शिरस = ज्ञान = माळशिरस.* पायी चालल्याने *शारीरिक* मुखाने नामस्मरण केल्याने *वाचिक* विठ्ठलध्यासाने *मानसिक* तपाबरोबर कीर्तन – प्रवचनाच्या *श्रवणाने* ज्ञानाची साखळी त्याला विठ्ठलरूप करते. 


*१३) वेळापूर -* त्यानंतर त्यांचा मुक्काम वेळापूरात होतो. *क्षणभर सुद्धा वेळ वाया न घालविता विठ्ठलभजन केले पाहिजे हे ज्ञान होते.*  


*१४) वाखरी -* वाखरीच्या मुक्कामी त्याची वाणी *प्रासादिक व वाचासिद्ध* होऊन.


*१५) नंतर तो पंढरपूर* जाऊन *पांडुरंगमय* होतो.


🚩🚩 पांडुरंग… पांडुरंग* *साई विठ्ठल।🚩🚩

Leave a comment